Recent Tube

Breaking

Sunday, August 13, 2023

स्व माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न.



स्व माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण देशाचे माजी कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार  व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते संपन्न.



रणसंग्राम न्युज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



स्व.भाई गणपतरावजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त सांगोला शहरामध्ये स्वर्गीय गणपतराव देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण व विज्ञान महाविद्यालयाचा नामांतरण सोहळा दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत सांगोला न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी संपन्न झाला.महाराष्ट्रात सांगोला हा एकमेव तालुका आहे की इथल्या मतदारांनी शेकाप आणि काँग्रेस सोडून दुसरा पक्ष स्वीकारला नाही.भाई गणपतराव देशमुख यांनी इथल्या लोकांना एक दिशा दिली आहे.ठरलेली वाट सोडून इथली माणसं दुसर्‍या वाटेला सहसा जात नाहीत.स्व.गणपतराव देशमुख यांची तिसरी पिढी राजकारणात काही चांगले करण्याचा प्रयत्न करत आहे.

पण पाठीशी लोकांनी खंबीरपणे उभे राहायला हवे, असे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोला येथील कार्यक्रमात केले.सांगोला येथे भाई गणपतराव देशमुख यांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमा निमित्ताने खा.शरद पवार बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे आ.जयंत पाटील, मा.खा.रणजितसिंह मोहिते, खा.रणजीतसिंह नाईक निंबाळकर, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष रामराजे नाईक निंबाळकर, खा.संजयकाका पाटील, माजी मंत्री महादेव जानकर, आ.शहाजीबापू पाटील, आमदार समाधान आवताडे, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार यशवंत माने, आमदार राम सातपुते, आमदार सचिन कल्याणशेट्टी,  आमदार सुमनताई आर पाटील, आमदार अनिल बाबर, माजी आमदार पंडितशेठ पाटील, माजी आमदार दीपकआबा साळुंखे-पाटील, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, माजी मंत्री राम शिंदे, मा.आ.प्रशांतराव परिचारक, विकास महात्मे, मा.आ.बाळा पाटील, कल्याणराव काळे, राजन पाटील, वैभवकाका नाईकवडी, प्रा.शिवाजीराव काळुंगे, भाजपा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, श्रीमती रतनबाई गणपतराव देशमुख, शहाजी पवार, जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद, जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, चंद्रकांतदादा देशमुख, पोपटराव देशमुख, डॉ.बाबासाहेब देशमुख, डॉ.अनिकेत देशमुख आदी नेतेमंडळी उपस्थित होती. 

मान्यवरांच्या हस्ते पुतळा अनावरण आणि महाविद्यालयाचा नामकरण सोहळा पार पडला.खा.शरदचंद्रजी पवार पुढे म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख हे 1962 साली विधानसभेत पहिल्यांदा निवडून आले. मी 1967 साली विधानसभेत निवडून आलो. भाई गणपतराव देशमुख यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी होती. दुष्काळी सांगोला तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांच्या हिताचा ते सतत विचार करत असत. तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्याला सांगोला येथे घेऊन येण्याची विनंती त्यांनी माझ्याकडे केली. मी त्यावेळी केंद्रीय कृषी मंत्र्याना घेऊन आलो.वाटंबरे येथे केंद्रीय मंत्र्यांनी पाहणी केली. इथल्या दुष्काळी पट्ट्यात डाळिंबाच्या बागा लागवड करण्यासाठी अर्थसाह्य करण्याची विनंती केली. तेव्हा डाळिंब बागायतीसाठी अर्थ सहाय्य देण्याचा महत्त्वाचा निर्णय भाई गणपतराव देशमुख यांच्यामुळे सरकारने घेतला.तो काळ शेकापच्या विचारांनी भारावलेला होता. माझी आई, भाऊ घरातील सर्वच लोक शेकाप विचारधारा मानणारे होते.भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांत स्पष्टता होती.गणपतराव देशमुख सूतगिरणी सुरु करुन देशाला दिशा दिली.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाई गणपतराव देशमुख यांच्या सोबत अनेक वर्षे काम करण्याची संधी मला मिळाली.भाई गणपतराव देशमुख यांची विधिमंडळातील भाषणे अभ्यासपूर्ण असत. प्रशासकीय कामासाठी त्यांच्याकडून अनेक नेते सल्ले घेत असत.त्यांचा अभ्यास मोठा होता. भाई गणपतराव देशमुख यांचा पूर्णाकृती पुतळा विधिमंडळाच्या परिसरात बसविण्याची मागणी होत आहे.आम्ही या मागणीचा निश्‍चित विचार करू.देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर तत्कालीन मंत्री गणपतराव देशमुख हे गाडी, बंगला सोडून एसटी बसने सांगोल्याला आले होते. विरोधी पक्षात राहून काम करण्याची शिकवण आम्हाला त्यांच्याकडून शिकता आली. त्यांचा एकलव्य म्हणून त्यांच्याकडून आम्हाला बरंच काही शिकता आलं.

आम्ही विदर्भाच्या प्रश्‍नावर बोलायचो. गणपतराव देशमुख बोलायला उठायचे, तेव्हा ते म्हणायचे, तुम्ही विदर्भाचे प्रश्‍न मांडता.पण, तुमचं आणि आमचं दुखणं सारखंच आहे. एकदा राज्याच्या दुष्काळी भागात फिरा म्हणजे हे दुखणं काय आहे, ते तुम्हाला कळेल,असे सांगायाचे. गणपतराव देशमुख यांच्या माध्यमातून विधानभवनात बर्‍याच गोष्टी शिकून घेतल्याचे देखील यावेळी देवेंद्र फडणीस यांनी बोलताना स्पष्ट केले.

राज्याचा पाणीप्रश्‍न काय आहे, हे त्यांच्या भाषणातून समजायचे. त्यांच्या भाषणातून ज्ञान मिळायचे. ते विधानसभेत कायम वंचित घटकाच्या व्यथा मांडायचे. विधानसभेत एकही दिवस सुटी न घेणारे आमदार, विधानसभा सुरू झाल्यानंतर शेवटपर्यंत ते सभागृहात बसून असायचे. सभागृहातून बाहेर जाणारे शेवटचे आमदार आबासाहेब असायचे, अशी आठवणही फडणवीस यांनी सांगितली.कुठलेही विधेयक चर्चेविना मंजूर होऊ नये, यासाठी भाई गणपतराव देशमुख कायम आग्रही होते.शेतकरी, वंचित घटकांबाबत त्यांच्या शब्दाला धार यायची. शेतकरी कामगार पक्षाचे आमदार चार ते पाच असायचे. पण, गणपराव देशमुख म्हणजे ’वन मॅन आर्मी’ होते.गणतराव देशमुख यांच्यासारख्यांमुळे महाराष्ट्र विधानसभेची उंची आहे; म्हणूनच देशात महाराष्ट्र विधानसभेचा नावलौकीक आहे, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांच्या कामाचे कौतुक केले.

यावेळी मारूतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, सूतगिरणीचे चेअरमन डॉ.प्रभाकर माळी, सीए के.एस.माळी, दादासाहेब बाबर, बाळासाहेब काटकर, समाधान पाटील, प्रा.नानासाहेब लिगाडे, पांडुरंग पांढरे, शिवाजी शेजाळ, अजित गावडे, रमेश जाधव, आप्पासाहेब कोकरे, हणमंत कोळवले, अवधूत कुमठेकर, अ‍ॅड. मारूती ढाळे, अ‍ॅड.सचिन देशमुख, संतोष कारंडे, प्रा.संजय शिंगाडे, नवनाथ शिंगाडे, बिरूदेव शिंगाडे, सुब्राव बंडगर, पिंटू बंडगर, रफिक तांबोळी, राजू मगर, स्वाती मगर यांच्यासह मान्यवर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते.

No comments:

Post a Comment